₹1500 हप्ता बंद! तुमचं नाव आहे का अपात्र यादीत? लगेच तपासा

मंडळी, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना आता हप्ता मिळणार नाही, कारण त्या अपात्र ठरल्या आहेत. सरकारनं काही कारणांमुळे अशा महिलांचा हप्ता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही काही महिलांची तपासणी सुरू आहे. म्हणूनच तुम्ही पात्र आहात का, हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे.

जर कोणत्याही महिलेला हप्ता मिळायचा असेल, तर तिच्या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं. जर उत्पन्न जास्त असेल, तर त्या घरातील महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही.

तसंच, जर घरातील कोणताही व्यक्ती आयकर भरत असेल किंवा ITR दाखल करत असेल, तर त्या कुटुंबातील महिलेलाही योजनेचा फायदा मिळणार नाही.

जर घरात कुणी सरकारी नोकरीत असेल, मग तो राज्य सरकार, केंद्र सरकार, नगरपालिका, महामंडळ किंवा इतर कुठलाही सरकारी विभाग असो – अशा घरातील महिला देखील अपात्र ठरतील. आणि जर कोणी निवृत्त झालं असेल आणि पेन्शन घेत असेल, तरीही त्या कुटुंबातील महिलेला योजनेचा हप्ता मिळणार नाही.

पण काही अपवाद आहेत. जर कोणी खासगी नोकरी करणारा असेल, कंत्राटी कामगार असेल, स्वयंसेवक असेल आणि त्याचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल, तर त्या घरातील महिलेला योजना मिळू शकते.

एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतर कोणत्याही सरकारी योजनेमधून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल, तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही. जसं की संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना घेणाऱ्या महिलांना ही योजना मिळणार नाही. पण PM किसान योजनेतून फक्त 500 रुपये मिळत असल्यामुळे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो.

राजकीय पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील महिला – म्हणजे खासदार, आमदार, मंडळाचे अध्यक्ष, संचालक वगैरे यांच्या घरातील महिलांना देखील हप्ता मिळणार नाही.

शेवटी एक महत्त्वाची अट – ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, त्या कुटुंबातील महिलांना देखील लाभ मिळणार नाही. फक्त ट्रॅक्टरला सूट आहे.

आता सरकारकडून अपात्र महिलांचा हप्ता थांबवण्याचे काम सुरू आहे. जर कोणी अपात्र असूनही हप्ता घेत असेल, तर तो कधीही बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या नियमांमध्ये बसता का ते जरूर तपासा.

Leave a Comment