कुक्कुटपालनसाठी सरकार देतंय लाखोंचं कर्ज आणि सबसिडी! अर्ज सुरू – चुकवू नका संधी!

जर तुम्ही कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल, तर महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली “कोंबडीपालन कर्ज योजना 2025” तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. या योजनेतून सरकार शेतकरी, महिलांनां, बेरोजगार तरुणांना कोंबडीपालन व्यवसायासाठी कमी व्याजात कर्ज देणार आहे. यात अनुदान म्हणजेच सरकारची आर्थिक मदत सुद्धा मिळेल.

ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा उद्देश आहे की लोकांनी आपला छोटा व्यवसाय सुरू करावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. कोंबडीपालन करायचं तर खूप मोठी जमीन लागत नाही. थोड्याशा जागेतही हे काम सुरू करता येतं. त्यामुळे गावात राहणाऱ्या लोकांसाठी ही योजना खूप चांगली आहे.

या योजनेत तुम्हाला कर्ज ५०,००० रुपयांपासून थेट १० लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. हे कर्ज परत करण्यासाठी ५ ते १० वर्षांपर्यंत वेळ दिला जातो. हे कर्ज तुम्ही राष्ट्रीय बँक, ग्रामीण बँक, सहकारी बँक किंवा नाबार्डकडून घेऊ शकता.

कोंबडीपालनासाठी लागणाऱ्या गोष्टी जसं की कोंबड्या, पिंजरे, औषधं, खाद्य, इत्यादींसाठी हे कर्ज वापरता येईल. काही भागात अनुदान सुद्धा मिळू शकतं. महिलांसाठी हे एक चांगलं काम आहे, ज्यातून त्यांना स्वतःचा रोजगार मिळेल आणि घराचा उत्पन्न सुद्धा वाढेल.

जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर काही अटी आहेत:

  • अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्रचा रहिवासी असावा.
  • वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावं.
  • अर्ज करणाऱ्याला कोंबडीपालनाचा थोडाफार अनुभव किंवा प्रशिक्षण असावं.
  • स्वतःची जागा किंवा शेतजमीन थोडी तरी असावी.
  • बँकेचा डिफॉल्टर नसावा.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रं:

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • व्यवसायाचा आराखडा (कोंबडीपालन कसा करणार आहात, याची माहिती)
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • बँक खाते झेरॉक्स
  • कोंबड्या, पिंजरे, औषधं यांची खरेदीची माहिती
  • प्राण्यांची काळजी घेता येते याचं प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर

अर्ज कसा करायचा?

  • तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जा (राष्ट्रीयकृत बँक किंवा ग्रामीण बँक)
  • तिथून “कोंबडीपालन कर्ज योजना 2025” साठी अर्ज फॉर्म मागवा
  • तो फॉर्म व्यवस्थित भरावा
  • सर्व कागदपत्रं त्यात जोडून फोटो लावा आणि सही करा
  • बँकेत फॉर्म जमा करा

त्यानंतर बँक तुमचे कागद तपासून पाहिल आणि सगळं बरोबर असेल तर कर्ज मंजूर करेल.

मित्रांनो, जर तुमच्याकडे थोडी जमीन असेल, आणि तुम्ही मेहनती असाल, तर ही योजना तुमचं जीवनच बदलू शकते. गावातच राहून व्यवसाय सुरू करा, स्वतःची कमाई करा आणि इतरांनाही काम द्या. ही योजना तुमच्यासाठी एक नवी संधी घेऊन आली आहे.

Leave a Comment