४००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात! पाहा पीएम किसानचे नवीन अपडेट

भारत सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये मिळतात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. हा पैसा शेतकऱ्यांनी बियाणं, खत किंवा इतर शेतीच्या कामांसाठी वापरावा, असा उद्देश आहे.

ही योजना केंद्र सरकारची आहे. यामुळे प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारनेही “नमो शेतकरी सन्मान निधी योजना” सुरू केली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा फायदा मिळतो.

शेतकऱ्यांना हे पैसे तीन वेळा मिळतात – दर चार महिन्यांनी 2000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. सगळी रक्कम ऑनलाइन पद्धतीने थेट खात्यात जाते, त्यामुळे कोणी मधेच पैसे घेत नाही आणि पैसे वेळेवर मिळतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले यांना एकत्र धरले जाते. या कुटुंबातील एक व्यक्ती अर्ज करू शकतो.

शुरुवातीला ही योजना फक्त 2 हेक्टर (सुमारे 5 एकर) जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी होती. पण आता ही अट काढून टाकली आहे. आता ज्यांच्याकडे जमीन आहे, ते सर्व शेतकरी अर्ज करू शकतात.

पण काही लोकांना या योजनेचा फायदा मिळत नाही. जसे की सरकारी अधिकारी, खासदार, आमदार, मंत्री, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आणि जे दरमहा 10,000 पेक्षा जास्त पेन्शन घेतात. याशिवाय जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात किंवा संस्थेच्या नावावर जमीन आहे, त्यांनाही योजनेचा लाभ मिळत नाही.

जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर त्याने pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन ‘New Farmer Registration’ या भागात जाऊन अर्ज भरावा लागतो. अर्जासाठी आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि जमीन कागदपत्रं लागतात.

ज्यांना वेबसाइट वापरता येत नाही, ते जवळच्या CSC (सामान्य सेवा केंद्र) वर जाऊन अर्ज करू शकतात. तिथे कर्मचारी मदत करतात. अर्ज दिल्यावर जिल्हा किंवा राज्य स्तरावर तो तपासला जातो. सर्व माहिती बरोबर असेल तर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात.

या योजनेसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची माहिती अपडेट करून ठेवावी.
त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे आणि खाते चालू असावे.
ई-केवायसी (e-KYC) ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी दिलेला पत्ता आणि मोबाइल नंबर नेहमी योग्य ठेवावा.
त्यांनी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर किंवा ॲपवर जाऊन आपली हप्ता स्थिती नियमित पाहावी.

या योजनेचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतात. ते पैसे शेतीच्या कामासाठी वापरता येतात. यामुळे कर्ज कमी होतं आणि पीक उत्पादन चांगलं होतं.

ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. कारण यामध्ये सगळं ऑनलाइन असतं आणि पैसे थेट खात्यात येतात. त्यामुळे काहीही लपवाछपवी होत नाही. शेतकऱ्यांना योग्य रक्कम वेळेवर मिळते.

Leave a Comment